नेमळें बादे तळवडे रस्त्याचे काम रखडले असल्याने तळवडे ग्रामस्थ यांनी दिले सार्वजानिक बाधकाम विभागास उपोषणास बसण्याचे पत्र!!

सार्वजनिक बांधकाम विभाग व सबधीत ठेकेदार यांनी दिले आठवड्यात रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन

सावंतवाडी

तळवडे येथून तळवडे बादे नेमळे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण काम रखडल्यामुळे तळवडे येथील ग्रामस्थांनी 400 सहयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांस दिले हां रस्ताचे काम गेल्या वर्षी सुरु केलें माञ पावसाळा सुरु झाल्याने काम थाबविण्यात आले होते. माञ आता बरेच महीने उलटले तरी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले नाही.

या रस्त्यासाठी 1कोटी 5 लाख रुपये निधि मंजूर झाला आहे .हा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मंजूर झालेला असून रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊन प्रत्यक्षात कामाची खडीकरण सुरुवात झालेली होती ,परंतु पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित काम थांबवण्यात आले आता पावसाळा संपून पाच महिने झाले तरी सुद्धा प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही किंवा काम सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून कोणतीही दखल घेताना दिसून येत नाही.

त्यामुळे हा रस्ता होण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत सार्वजनिक बांधकाम विभागला उपोषणास बसण्याचे पत्र दिले. येथील ग्रामस्थांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्र दिले.यावेळी प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्यास 26 जानेवारी रोजी तळवडे बादे नेमळे या रस्त्यावर उपोषणास बसण्याचे यावेळी निवेदन दिले.त्यामुळें सार्वजनिक बांधकाम विभाग व सबधित ठेकेदर यांनी चार दिवसांत रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल असे यावेळी ग्रामस्थ यांना दिले.

या रस्त्याचे डांबरीकरण कामासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा निधी मंजूर झाला होता. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे गेले काही महिने हा रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याचा आरोप तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते दादा परब यांनी केला आहे. . आज एकदरित विचार करता ग्रामीण भागातील रस्त्याचे काम दर्जात्मक होताना दिसत नाही. त्यामुळें ग्रामीण भागांतील जनता जागृत असल्यास त्या ठिकाणचा रत्या चांगला होताना दिसतो आज ग्रामीण भागातील रस्ते डाबरिकण होऊन एक वर्ष न होता पाउसाच्याहगामात वाहून जाताना दिसतात. यावर कडक बधन येणे गरजेच आहे. शहरी भागात रस्त्याची काम दर्जात्मक स्वरूपात केली जातात. मात्र ग्रामीण भागात रस्त्यांची काम दर्जात्मक स्वरूप दिसून येत नाही. नागरीक यांनी जागृत होण्याची वेळ आली आहे.
यावेळी हे निवेदन तळवडे येतील सामाजिक कार्यकर्ते दादा परब, शंकर सावंत, नीळकंठ नागडे,उदय शिरोडकर, श्यामसुंदर कुंभार, शाम शेटकर ,विश्वनाथ भैरे, बाबी रेडकर यांनी बांधकाम अभियंता श्री. रणशूर यांना दिले.