सावंतवाडी तालुक्यातील सर्वात मोठया असणाऱ्या तळवडे ग्रामपंचायत मध्ये 72,81,076 रुपयांचा अपहार झाल्याचे जिल्हा प्रशासन कडून झाले उघड मात्र गटविकास अधिकारी सावंतवाडी याच्याकडून कोणतीही कारवाई नाही

कारवाई न झाल्यास 1मे रोजी उपोषणाला बसणार !! सामाजिक कार्यकर्ते नारायण जाधव यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील सर्वात मोठया असणाऱ्या तळवडे ग्रामपंचायत मध्ये 72,81,076 रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल जिल्हा परिषद कार्यालय कडून 11 मार्च 2024 ला प्राप्त झाला आहे. मात्र याबाबत अद्याप पर्यंत गटविकास अधिकारी सावंतवाडी यांनी कोणतीही कारवार केली नाही. याप्रकरणी एकूण 11 जणांवर आरोप निश्चित केले असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. असे जिल्हा परिषदेने आपल्या अहवालात म्हटले आहे. तरी याबाबत अद्याप पर्यंत कोणतीच कारवार्ड झाली नसल्यामुळे 1 मे रोजी आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा नारायण उर्फ बाळा जाधव, अध्यक्ष गाव तंटामुक्त समिती, तळवडे यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिला. या ग्रामपंचायत अपहार प्रकरणी आपण न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत सुशांत गावडे व शंकर सावंत उपस्थित होते.या अपहरण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता यांनी बिल रेकॉर्डिंग केले असून मोजमाप पुस्तकामध्ये खाडाखोड करण्यात आली असल्याचेही समजते. मात्र या अभियंत्यावर कोणतीच कारवार्ड करण्यात आली नाही. ज्यांच्या सहीने ठेकेदाराला धनादेश देण्यात आले त्यांच्यावर आणि ठेकेदारालावर हि कोणती कारवाई करण्यात आली नाही. यातील प्रत्येकावर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. नाहीतर याबाबत आपण न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले. आज ग्रामीण भागात ग्रामपंचायत मधील कारभार पारदर्शक असणे गरजेचे आहे. माञ आज भ्रष्टाचाराचे कुरण ग्रामीण भागातील तळागाळात पोचले आहे त्यामुळे अशा भ्रष्टाचारी अधिकारी व त्यांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे ,तरच ग्रामीण भागाचा विकास चांगला दर्जात्मक होऊ शकतो व गोरगरीब जनतेची कामे योग्य वेळेवर घडू शकतात असे मत यावेळी सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ बाळा जाधव यांनी व्यक्त केले .आज जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये दर्जात्मक कामे होताना दिसत नाही त्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी जागृत असणे गरजेचे आहे. आज तळवडे सारख्या ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार उघड झाला आहे त्यामुळे नागरिकांनी जागृत असणे गरजेचे बनले आहे.