केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजयी करून जनतेने कोकणची प्रतिष्ठा जपली!शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर


सावंतवाडी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजयी करून जनतेने
कोकणची प्रतिष्ठा जपली अशी पहिली प्रतिक्रिया शालेय
शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केली.तसेच मतांचे ध्रुवीकरण, एका समाजाच्या लोकांनी केलेला विरोध,खोटा प्रचार या कारणांमुळे महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही असे त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी
ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर उपस्थित होते.केसरकर म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयासाठी राणे कुटुंबीय सौ निलम राणे, निलेश राणे,आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच महायुतीचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चांगल्या पद्धतीने काम केले त्या सर्वांचे आभार मानतो. कोकणच्या सुपुत्राला भारताची सेवा करण्यासाठी संसदेत जाण्याचे स्वप्नपूर्ण केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळवून मिळाले आहे. या रत्नागिरी सिंधुदूर्ग या लोकसभा मतदार संघातून राणे हे निवडणुकीत विजयी झाल्याने कोकणच्या विकासाला चालना मिळणार आहे.