होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला तळवडे सावंतवाडी वाहतूक २६ तास ठप्प


सावंतवाडी
होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक २६ तास ठप्प गेले दोन दिवस बंद आहे. सतत दार पळत असलेल्या पावसामुळे होणारे पाळणा घोडावडे पुलावरील पाणी कमी होत नाही त्यामुळे सावंतवाडी तळवडे वेंगुरला वाहतो पूर्ण पणे ठप्प झाली आहे या पुलाची उंची कमी असल्यामुळे या पुलावर वारंवार पाणी येत असते ,काल मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे काल बारा वाजल्यापासून या पुलावर पाणी आले आहे . आज दुपार पर्यंत पाणी कमी झाले नाही.तळवडे नदीपात्राला मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आल्यामुळे या पुलावरून जाणारी वाहतूक सद्यस्थितीत बंद आहे. त्यामुळे वाहन चालक प्रवासी वर्ग नोकरवर्ग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी प्रवासी वर्ग ,व वाहन चालक ,यांच्याकडून होताना दिसत आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाची उंची वाढवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. हे पुल बाधूनबरीच वर्ष झाली आहे. त्यामूळे हे पुल नव्याने बांधणे गरजेचं आहे तसेच पुलाची उंची वाढवणे गरजेचे बनले आहे.