सावंतवाडी टर्मिनस झाले असते तर आज प्रवाशांचे हाल झाले नसते. !चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे(शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)चे जिल्हा समन्वयक)

सावंतवाडी
अतिवृष्टीमुळे पेडणे भागात कोकण रेल्वे मार्गावर

बोगदया मधे पाणी साठले. त्यामुळे कोकण रेल्वेने गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रवाशांचे खूप हाल झालेत. कोकण रेल्वेला जवळपास 25 वर्ष पूर्ण झालीत.

कोकणात अशी पावसाळी परिस्थिती असताना रेल्वे टर्मिनल ची मागणी सावंतवाडीत सातत्याने झाली तसेच टर्मिनसचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. परंतु प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही जर काम सुरू झाले असते.

तर आज रेल्वे गाड्यांना सावंतवाडी टर्मिनसला थांबा मिळाला असता आणि येथून नवीन गाड्या निघाल्या असत्या. मंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा या योजनेतून निधी रेल हॉटेल टर्मिनस साठी जाहीर केलेला पण तो निधी सुद्धा का दिला नाही? म्हणजे विकासाची फक्त वल्गना करणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांमुळेच आज रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्यात यामुळे प्रवाशांचे हाल झाले. त्याला जबाबदार मंत्री केसरकरच आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सारखीच रेल्वे टर्मिनसची सुद्धा फक्त घोषणाच ठरली आहे. रेल्वे टर्मिनस सुरू झाला असत तर सावंतवाडी टर्मिनस पर्यंत येऊन परत मुंबईच्या दिशेने गाड्या धाऊ शकल्या असत्या .आता मात्र त्या गाड्या धाऊ शकत नाहीत आणि बऱ्याच गाड्यांना थांबा मिळत नाही. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाला केसरकरच जबाबदार आहेत असे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)चे जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांची प्रसिद्धी पत्रकामार्फत टिका केली
आहे .