कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 25 ऑगस्टला होणार रत्नागिरीत

मुंबई – गोवा महामार्गाला दानशुर भागोजीशेट कीर यांचे नाव देण्यात यावे चार जिल्ह्याच्या बैठकीत झाला ठराव..

कुडाळ

कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 2024 हे रविवार दिनांक 25.08.2024.रोजी सावरकर नाट्यगृह,श्रीमान भागोजीशेठ कीर पुण्यनगरी,रत्नागिरी येथे ठीक सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आज शनिवार कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय कुडाळ या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ आणि ईतर कोकण पट्ट्यातील एकूण चार जिल्हे रायगड ,अलिबाग , रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग, प्रत्येक जिल्ह्यातील महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कुडाळ येथील बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.रमण वायंगणकर ,रत्नागिरी जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.राजीव किर ,महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स चे बोर्ड बेंबर श्री.आशिष पेडणेकर ,जिल्हा भंडारी उपाध्यक्ष श्री.सुनील नाईक ,सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री.अतुल बंगे ,सिंधुदुर्ग भंडारी कार्याध्यक्ष श्री.हेमंत करंगूटकर ,श्री.भाई कांबळी ,श्री. लक्ष्मीकांत मुंडीये , मालवण भंडारी तालुका अध्यक्ष श्री.रवींद्र तळाशीलकर ,भंडारी जिल्हा चिटणीस तथा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री.समील जळवी, जिल्हा सद्स्य श्रीकांत वेंगुर्लेकर ,श्री.सागर हडकर ,श्री.राजन बोरकर ,श्री.राजेंद्र आंबेरकर ,श्री.गोविंद सोनसूरकर ,श्री.अजित गवंडे ,श्री.विलास करंजेकर ,श्री.मुणगेकर ,श्री.दिलीप भाटकर ,श्री. नितीन तळेकर ,श्री. राजन बोरकर ,श्री. भालचंद्र नागवेकर अन्य उपस्थित होते.

संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वसलेल्या भंडारी समाजाचे महाअधिवेशन होणार आहे.त्यानिमित्त भंडारी समाजाचा इतिहास,ज्ञाती संघटना,समाजरत्ने, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते,कलाकार यांची संक्षिप्त माहिती देणारी ‘स्मरणिका’ देखील प्रकाशित केली जाणार आहे.या बैठकीत महाअधिवेशन कशाप्रकारे यशस्वी केले पाहिजे याविषयी प्रत्येक जिल्ह्यातील मान्यवरांनी या बैठकीत भूमिका मांडल्या या बैठकीत सर्वानुमते मुंबई – गोवा या महामार्गाला श्रीमान दानशुर भागोजीशेट कीर यांचे नाव देण्यात यावे असा ठराव भंडारी बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.त्यानंतर भंडारी समाजाच्या लोगोचे रीबीन च्या साहाय्याने अनावरण आले.आणि रत्नागिरी येथे होणाऱ्या महाअधिवेशन संदर्भातील नियोजनाची चर्चा करण्यात आली.या बैठकीला उपस्थिती सर्व समाज बांधवांना महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स चे बोर्ड मेंबर श्री.आशिष पेडणेकर यांनी संबोधित करून समाज बांधवांना मार्गदर्शन केले.त्यानंतर भंडारी समाजाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. रमण वायंगणकर,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.राजीव किर आणि सिंधुदुर्ग चे माजी भंडारी जिल्हाध्यक्ष श्री.अतुल बंगे यांनी उपस्थित भंडारी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

,छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले ते अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून आणि त्यामध्ये किनारपट्टीवरील भंडारी समाजाने मोलाची साथ दिली.समुद्रावर छातीठोकपणे व्यापार करणाऱ्या भंडारी समाजाला सोबत घेवून स्वराज्याच्या आरमाराची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्या आरमाराचे प्रमुख होते मायनाक भंडारी ! भंडारी समाजाच्या नेतृत्वाखाली कोकणी आरमाराने इतिहास घडविला आणि जगज्ज्तेत्या ब्रिटीशांचा व मुघलांचा दारुण पराभव केला.

भंडारी समाजामध्ये अनेक रत्ने निर्माण झाली त्यात समाजभूषण रावबहाद्दूर सी. के. बोले, दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर, चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर उद्योगश्री रावबहादूर काकासाहेब सुर्वे, भंडारी बँकेची निर्मिती करणारे भाई सारंग अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. एक काळ व्यापार, उद्योग, आरमार, पोलीस खाते, राज व्यवस्था, प्रशासन यामध्ये भंडारी समाजाचा मोठा दबदबा होता.भंडारी समाजाचा धाक अख्ख्या देशाला होता.भारतातील पहिले पोलीसदल सुद्धा ५०० भंडारी पोलिसांचे होते.त्यांच्यावर मुंबईचे रक्षण करण्याची जबाबदारी होती.सांगायचे तात्पर्य असे की,भंडारी समाजाची ताकद ओळखून शिवाजी महाराजांनी त्यांच्या ताकदीवर आरमार उभे केले.ब्रिटीशांनी भंडारी समाजाची न्यायी वृत्ती आणि ताकद बघून मुंबईच्या रक्षणासाठी भंडारी मिलेशियाची (पोलीसदल) स्थापना केली.