कोकण म्हणजे समृद्ध ही व्याख्या दिल्लीपर्यंत जावी ही माझी इच्छा खा.नारायण राणे

खा नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा विकसित जिल्हा म्हणून पुढे येईल. सार्वजानिक बाधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

सावंतवाडी रेल्वे स्थानक सुशोभिकरण लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

सावंतवाडी 

कोकण म्हणजे समृद्ध ही व्याख्या दिल्लीपर्यंत जावी ही माझी इच्छा आहे. मात्र, आपला सिंधुदुर्ग जिल्हा या प्रगतीत कुठे आहे याचा विचार व्हायला हवा. पर्यटनातून प्रगती साध्य करता येणार आहे. औद्योगिक क्रांतीला देखील आज महत्व आले आहे. माझा जिल्हा कसा प्रगत होणार याचा विचार सर्वांनी करणं आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्यात सर्वकाही आहे. मात्र, अंतर्गत स्पर्धेशिवाय बाहेरील उद्योजकांसोबत स्पर्धा करा. आळस झटका व प्रगतीचे मार्ग शोधा. भांडण -तंटे, जात – पात, कोर्ट -कचेऱ्या विसरून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कार्यरत रहा, असा मौलिक सल्ला माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी दिला.
 
सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाचे लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी यावेळी खा नारायण राणे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्ग व सावंतवाडीच्या स्थानकांच्या लोकार्पणाच्या माध्यमातून रविंद्र चव्हाण यांनी देखील हॅट्रिक केली. त्यांनी अभिमान वाटावं असं रेल्वे स्थानकाच सुशोभीकरण केलं आहे. मंत्री रविंद्र चव्हाण या जिल्ह्याच दरडोई उत्पन्न चार लाखांपर्यंत घेऊन जातील. याचा फायदा लोकांनी घ्यावा, कोकणी माणूस हुशार आहे. मुंबई सारख उत्पन्न आपलं व्हाव ,यासाठी कोकणी माणसाने प्रयत्न करावेत. आम्ही प्रगती करत राहू. मात्र, व्यवसायाशी स्पर्धा आपल्याला करायची आहे‌. कोकण म्हणजे समृद्धी ही संकल्पना दिल्लीपर्यंत जावी यासाठी प्रयत्न करा असं आवाहन नारायण राणे यांनी केलं.
.

कोकण रेल्वेने मागणी केल्यास कोकण रेल्वेच्या आतील भागाचे प्लॅटफॉर्म वर शेडी यांचा कायापालट एक वर्षात केला जाईल!

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आश्वासन

माझ्या मंत्रीपदाचा उपयोग सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केला!

कोकणातील १२ रेल्वे स्थानकांच रूपडं पालटण्यात आलं. येणार्या काळात असेच काम तुम्हाला दिसेल


माझ्या मंत्रीपदाचा उपयोग सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केला. संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत निधी उभारला. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी ९२ हजार कोटींच्या कामाला मंजुरी व कामाला सुरुवात केली. साडेपाच हजार कोटी रुपये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिले. कोकण रेल्वेने दिलेल्या परवानगीमुळे त्याचा बाह्य भाग बदलू शकलो‌.कोकणातील १२ रेल्वे स्थानकांच रूपडं पालटण्यात आलं. येणार्या काळात असेच काम तुम्हाला दिसेल. जर कोकण रेल्वे प्रशासनाने परवानगी दिल्यास आतल्या भागाचा पण कायापालट वर्षभरात केला जाईल असे आश्वासन यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळा वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

यावेळी व्यापीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, भाजयुमो राज्य उपाध्यक्ष विशाल परब, भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष, रवींद्र मडगावकर,सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक,माजी नगरसेवक उदयनाईक, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे सरपंच सुहानी गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या छाया नाईक, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपविभागीय अधीक्षक अभियंता वैभव सगरे, सहाय्यक अभियंता प्रमोद लोहार, कोकण रेल्वेचे संचालक हेगडे, प्रधान मुख्य अभियंता नागदत्त राव,स्थापत्य अभियंता कैलास कासार, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन राणे, भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, चद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. तर यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्हर्चुअल उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्थापत्य अभियंता कैलास कासार, रोहित नाडकर्णी, आर्किटेक सोहम सावंत,उपविभागीय अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपविभागीय अभियंता वैभव सगरे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींना माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.

.

.