सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना शिष्टमंडळ व कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांची मुंबईत बैठक लावून सावंतवाडी रेल्वे टर्मिनस संदर्भात च्या समस्या लवकर सोडवल्या जातील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन !घंटानाद आंदोलनला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

रेल्वे यंत्रणा दाद देत नसेल तर वठणीवर आणण्यासाठी एकजूट दाखवावी. नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही भाजप नेते तथा माजी आमदार राजन तेली

सावंतवाडी
सावंतवाडी रोड टर्मिनस वर रेल्वे गाड्यांना थांबा, टर्मिनसला प्रा मधू दंडवते यांचे नाव, गाड्यात पाणी भरण्याची सुविधा अशा विविध मागण्यांसाठी सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने घंटानाद आंदोलन छेडले. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, भाजपचे माजी आमदार राजन तेली, ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आदींनी भेट देऊन घंटानाद आंदोलनाला प्रतिसाद दर्शविला.

सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना शिष्टमंडळ व कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांची मुंबईत बैठक लावून सावंतवाडी रेल्वे टर्मिनस संदर्भात च्या समस्या लवकर सोडवल्या जातील !शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला टर्मिनस नामकरण, रेल हाॅटेल, रस्ता व एक बैठक आयोजित करावी आदींबाबत सविस्तर चर्चा केली. केसरकर म्हणाले, सावंतवाडी रोड टर्मिनस भूमिपूजन झाले तसे नामकरण करण्यासाठी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल. रस्ता मंजूर असून बैठक आयोजित करून चर्चा घडवली पाहिजे असे आपण कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी बोललो आहे. रेल्वेत पाणी भरण्यासाठी योजना राबविली जाणार असून मळगाव, कुंभार्ली व वेत्ये गावालाही पाणी पुरवठा होईल अशा स्वरूपाचा आराखडा बनवला आहे असे केसरकर यांनी सांगितले.तसेच रेल हाॅटेल प्रकल्पही मंजूर करण्यात आला आहे. कोकण रेल्वेशी अधिक चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

रेल्वे यंत्रणा दाद देत नसेल तर वठणीवर आणण्यासाठी एकजूट दाखवावी. नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही ! भाजप नेते तथा माजी आमदार राजन तेली


भाजपचे माजी आमदार राजन तेली म्हणाले, रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून मागण्या पोहचवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातोय. रेल्वे प्रवासी संघटना रेल्वे रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे .त्याला माझा पाठिंबा आहे. प्रसंगी नेतृत्व देखील करेन. त्यासाठी प्रवाशांची एकजूट महत्त्वाची आहे. रेल्वे यंत्रणा दाद देत नसेल तर वठणीवर आणण्यासाठी एकजूट दाखवावी. नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकार, स्थानिक खासदार व लोकप्रतिनिधींनी यावर पुर्ण लक्ष घातल्यास सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या सर्व समस्या सुटतील !कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर.

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर म्हणाले,आजच आंदोलन हे झोपेच सोंग घेतलेल्या लोकांना जाग आणण्यासाठी आहे. सावंतवाडी टर्मिनसच भुमिपूजन होऊन ५० टक्के काम पूर्ण झाल. मात्र, उर्वरीत काम अडविण्यासाठी काहीजण पुढाकार घेत आहेत. हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ? ते शोधून काढून जनतेन त्यांचा बंदोबस्त करावा. त्याचवेळी रेल्वे टर्मिनसच काम पूर्णत्वास येईल. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्य दिनी ‘घंटानाद’ आंदोलन छेडण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.

अँड. निंबाळकर म्हणाले, २६ जानेवारीला काही लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्र्यांशी भेट करुन देतो असं आश्वासन दिलं होतं. मात्र, ती भेट करून दिली नाही. त्यावेळचे प्रश्न देखील तसेच प्रलंबित आहेत. राज्य सरकारकडून रेल्वेला आवश्यक गोष्टी पुरवण्याच काम सुरू झालं आहे. तिलारीतून येथे येणाऱ्या पाण्यासाठी साडेपाच कोटीची मंजूरी देण्यात आली आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या काही अडचणी राज्य सरकार दुर करताना दिसत आहे. त्यामुळे पुढील भुमिका केंद्र सरकार, स्थानिक खासदार व इतर लोकप्रतिनिधींनी घ्यायची आहे. मात्र, ती भुमिका घेताना ते दिसत नाही. आजच आंदोलन हे त्यांना जाग आणण्यासाठी, झोपेच सोंग घेतलेल्यांसाठी आहे. सावंतवाडी टर्मिनसच भुमिपूजन होऊन ५० टक्के काम पूर्ण झाल. मात्र, उर्वरीत ५० टक्के काम अडविण्यासाठी काहीजण पुढाकार घेत आहेत. हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ? ते शोधून काढून जनतेन त्यांचा बंदोबस्त करावा. त्याचवेळी रेल्वे टर्मिनसच काम पूर्णत्वास येईल असं मत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर यांनी व्यक्त केले.

आमदार व खासदारांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी सचिव मिहीर मठकर यांनी केली. काढून घेतलेले थांबे, नवे थांबे रेल्वे गाड्यांना द्यावे तसेच प्रा. मधू दंडवतेंच नाव सावंतवाडी टर्मिनसला द्यावे अशी विनंती केली.‌

कोकण रेल्वेन‌ आम्हाला बेलापूरला बोलावल होत. मात्र, अल्प काळात हे निमंत्रण मिळाल्याने तेथे जाण शक्य झालं नाही. कोकण रेल्वे व व्यवस्थापकांसह आमच्या लोकप्रतिनिधींनी बैठक लावावी, ती आवश्यक आहे. आमच्या स्थानकच उत्पन्न खूप चांगल आहे. असे असतानाही सावंतवाडी टर्मिनसकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेसोबत बैठक घेऊन आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवाव्यात. यासाठी आमदार व खासदारांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी केली.
ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, मायकल डिसोझा शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, गजनान नाटेकर, यांनी भेट देऊन घंटानाद आंदोलनाला प्रतिसाद दिला. त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना रेल्वे प्रवासी संघटनेच्या बरोबर आहे असे सांगितले.
याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, अँड. नकुल पार्सेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,नंदू तारी, बाळासाहेब बोर्डेकर,अभिषेक शिंदे, भुषण बांदिवडेकर, सागर तळवणेकर, सागर नाणोसकर, लीलाधर घाडी, नरेंद्र तारी, सुधीर राऊळ, प्रथमेश पाडगांवकर‌, विनोद नाईक, गुरुनाथ गावकर,आदी मान्यवर उपस्थित होते.