शिवसेना नेते रामदास कदम जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत महायुतीच्या बैठकीला जाणार नाही! माजी आ. राजन तेली

सावंतवाडी

 सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी लोकसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. मुंबई पासून कोकणापर्यंत त्यांच्या मेहनतीमुळे आज भाजपाला आणि महायुतीला यश मिळाले आहे. म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याचा रामदास कदम यांना नैतिक अधिकार नाही.

मंत्री रवींद्र चव्हाण हे महायुतीच्या लोकसभा निवडणूकीतील विजयाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रामदास कदम यांना आवर घालण्यासाठी मागणी करणार आहोत, रामदास कदम यांनी माफी मागितली पाहिजे, असे मत माजी आमदार राजन तेली यांनी आज सावंतवाडी येते पत्रकार परिषदेत येथे व्यक्त केले.

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या बैठकीला जाणार नाही. असा पवित्रा आम्ही घेतला आहे, असे तेली म्हणाले.