मंत्री असताना महाराष्ट्राची सेवा केली आता कोकण विभागाची सेवा करणार!माजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

सावंतवाडी,

दोनवेळा मंत्री म्हणून मी काम केल आहे. शिक्षणमंत्री असताना केलेल्या कामाच समाधान मला आहे. साईबाबा जे घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर याकडे अधिकच लक्ष देणं आवश्यक होते. त्यामुळे या विभागाची अधिकची सेवा घडावी अशी साईंची इच्छा असेल म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तसा निर्णय घेतला आहे. निवडणूकीत देखील मी कोकण विभागाची सेवा करणं अधिक आवडेल असं म्हंटले होते अशी प्रतिक्रिया माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांनी दिली आहे. मंत्रीमंडळात वर्णी न लागल्याबद्दल विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हिवाळी अधिवेशनाला जाण्यापूर्वी त्यांनी शिर्डी येथे साईबाबांच दर्शन घेतल. यावेळी ते बोलत होते.

निवडणूकीत देखील मी कोकण विभागाची सेवा करण अधिक आवडेल असं म्हंटले होते. एकनाथ शिंदे हे फायटर नेते आहेत. चांगल्या योजना त्यांनी राज्यात राबविल्या. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. माझ्यावर अन्य कोणती जबाबदारी दिली जाणार आहे का ? याची कल्पना नाही. आमदारांची भेट घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकदाच भेट झाली. त्यानंतर अद्याप भेट झालेली नाही. शिक्षणविभागात क्रांतीकारी निर्णय मी घेतलेत. पुढील मंत्र्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. मराठी भाषा विभागातही उल्लेखनीय कार्य केलं. मी केलेल्या कामाच समाधान आहे. साईबाबा जे घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत चांगलं यश महायुतीला मिळू देत अस साकड साईचरणी घातलं आहे. कोकणात विशेषत: सिंधुदुर्गात पर्यटनाची खूप संधी आहे. मात्र, त्या प्रमाणात पर्यटन तिथे आलं नाही. त्यासाठी अधिक मेहनत घेणार आहे.