सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ वधु-वर स्नेह मेळावा!समाजाने संस्कृती व पंरपरा जतन करावी! केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक!


भंडारी समाज सर्वांना बेरोबर घेऊन जाणारा समाज- दीपक केसरकर

सावंतवाडी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भंडारी समाजाचा एक गौरवशाली इतिहास आहे. स्वराज्याया आरमारा कणा भंडारी समाजा होता. भंडारी समाज विखुरला असून गतवैभव प्राफ्त करण्यासाठी आपल्यातील मतभेद विसरून एक झाले पाहिजे, आज आपण आधुनिक युगात वावरत असलो तरी समाजाने संस्कृती व पंरपरा जतन करावे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे केले.
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचा वधु-वर व स्नेह मेळावा रविवारी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात झाला. यावेळी उद्घाटक म्हणून नाईक बोलत होते. कार्यक्रमाया अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भंडारी मंडळाचे अध्यक्ष नवीनांद्र बांदिवडेकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणमंत्री व आमदार दीपक केसरकर व उद्योजक प्रकाश तांबोस्कर हे होते.




यावेळी जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत कलंगुटकर, विष्णू पेडणेकर,तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, सचिव दिलीप पेडणेकर, उपाध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, देविदास आडारकर, बाळा आकेरकर, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, हनुमंत पेडणेकर, खजिनदार श्री वाडकर, राजेंद्र बिर्जे, नीलेश कुडव, सिद्धार्थ पराडकर, लवू कुडव, ज्ञानदीप राऊळ, नंदकिशोर कोंडये, बाळू साळगावकर, दीपक जोशी, भंडारी महिला मंडळाया अध्यक्षा शीतल नाईक, समता सुर्याजी, डॉ. दिनेश नागवेकर, भंडरी पतसस्थेचे श्री पेडणेकर, ज्ञानदीप राऊळ, विलास माळगवारक, विकास केरकर, नाना मसुरकर, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नाईक पुढे म्हणाले, सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाने वधू-वर मेळावा आयोजित करून चांगला उपक्रम हाती घेतला आहे.
समाजात सध्या लग्न जुळण्याच्या समस्या आहेत. अशा काळात असे वधू-वर मेळावे आयोजित करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मंडळाने घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. या माध्यमातून समाजही संघटित होण्यास मदत होते. भंडारी मुळचे लढवय्ये, त्यांना हाताशी धरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. भंडाऱयांनी प्राण पणाला लावून महाराजांची साथ केली. त्यापैकी महत्वाचे नाव म्हणजे मायनाक भंडारी. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरमाराने अनेक पराक्रम केले. ब्रिटिशांनाही सडेतोड उत्तर देण्याची हिम्मत भंडारी समाजात होती. भंडारी समाज विखुरलेल्या स्वापात आहे. आपली ताकद, पूर्वइतिहास हा समाज विसरत चालला आहे. भंडारी समाज पुन्हा एकसंघ कसा होईल, आपले गतवैभव आपल्याला कसे प्राफ्त करता येईल, याचा विचार व्हायला हवा. भंडारी समाज एवढा मोठा आहे की, इतर समाजालाही आधार देण्याची क्षमता या समाजामध्ये आहे. त्यामुळे आपल्यामधील मतभेद विसरून ज्योतज्योतीने मशाल पेटवावी लागेल. अहंकार बाजूला ठेवून आपण पुढे गेले पाहिजे. भंडारी समाजाने आपली शक्ती जागृत करायला हवी आपल्याला जेव्हा आपल्या ताकदीची जाणीव होईल, तेव्हा सर्वांना हा समाज पुरून उरेल, असे नाईक म्हणाले.
आमदार दीपक केसरकर यांनी भंडारी समाजाला गौरवशाली इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून या समाजात अनेक लढवय्ये होऊन गेले. ब्रिटिशांच्या काळात भंडारी समाजाचे स्वतंत्र पोलीस दल होते. हा समाज सर्वांना बरोबर घेऊन जाणारा समाज आहे. या समाजाचे अनेक लोक माझे पदाधिकारी आहेत. मला या समाजाने नियमित साथ दिली आहे. त्यामुळे सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ जे उपक्रम राबवित आहेत त्यात माझा सहभाग असणार आहे. मंडळाने वधू-वर मेळावा भरवून चांगला उपक्रम हाती घेतला आहे, असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाया अध्यक्षस्थानावरून बोलताना बांदिवडेकर म्हणाले, भंडारी ज्ञातीतील युवकांना रोजगार प्राफ्त होण्यासाठी लवकरा मुंबईत भंडारी समाजातील उद्योजकीं परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्या हेतू आहे. समाजातील अनेकजण आज उद्योग व्यवसायात आहेत. आजाया ताणांनीही उद्योजक बनण्यो ध्येय डोळया समोर ठेवून नोकऱया देणारे बनावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमो सूत्रसांलन प्रा. सुषमा मांजरेकर यांनी केले. स्वागत अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी तर मान्यवरांचा परिचय प्रवीण मांजरेकर यांनी केला. प्रास्ताविक मंडळो सहसािाव नामदेव साटेलकर, आढावा संजय पिळणकर यांनी तर आभार बाळा आकेरकर यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमानंतर वधु-वर मेळावा झाला. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 200 हून अधिक जणीं नोंदणी केली होती.

