हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने वेंगुर्लेत हिंदु साम्राज्यदिन म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन साजरा .

हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने वेंगुर्लेत हिंदु साम्राज्यदिन म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन साजरा .

सावंतवाडी

हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने वेंगुर्लेत माणिकचौक येथील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच शिवप्रार्थना म्हणुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला .
यावेळी मान्यवरांनी छत्रपति शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन अभिवादन केले . तसेच कु.शिवानी खानोलकर हिने शिवराज्यभिषेक दिनाचे महत्व विषद केले .यावेळी हिंदु साम्राज्यदिनाची महती सांगताना बाबुराव खवणेकर सर म्हणाले कि , ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1974 या दिवशी जगामध्ये एक अघटीत घटना घडली ती म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक सार्वभौम राजा छत्रपती शिवाजी महाराजांना पंडित गागा भट्टच्या हस्ते राज्याभिषेख अद्भुत , उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. रयतेचा राजा छत्रपती झाला. अठरापगड जातीतील सर्व सामान्य घरातील तरुणांना संघटित करून हिंदूंचा राजा होऊ शकतो हे जगाला दाखवून दिले. अनेक देश त्यांच्या धोरणांचा, नितींचा अभ्यास करीत आहेत. केवळ राज्याभिषेख नाही तर हिंदू संस्कृती प्रमाणे सर्व व्यवस्थाच निर्माण केली. स्वतःच्या नावाने शक सुरू केले. चलन व्यवहारात आणले. सामान्य शेतकऱ्यांचा विचार करून कर प्रणाली चालू केली. पारशी शब्दांऐवजी संस्कृत प्रचुर मराठी शब्द व्यवहारात आणले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य माणसामध्ये हे राज्य माझे/ आमचे आहे असा विश्वास निर्माण केला. पानिपतच्या लढाईत मिळालेले अपयश विचारात घेतले. पृथ्वीराज चव्हाण ने महम्मद घोरीला सतरा वेळा जीवदान दिले त्याचा परिणाम विचारात घेतला आणि आपण कसा विचार करायला पाहिजे हे जनतेला दाखवून दिले. केवळ राज्याभिषेख नाही तर राजाने जनतेचा विचार कसा करायला पाहिजे याची संपूर्ण व्यवस्थाच निर्माण केली. म्हणून तर 400 वर्षांनंतरही या राजाचा जयजयकार तितक्याच प्रेरणेने आपण करतो. शिवराज्याभिषेकाने आपल्याला हेच दान दिलेले आहे.
यानंतर उपस्थित हिंदुधर्माभिमानी मंडळींनी छत्रपती शिवाजीमहाराज यांना मानाचा मुजरा केला .