त्यांच्या 35 वर्षांनी जुन्या आठवणींना मिळाला उजाळा!

श्री जनता विद्यालयातील दहावीच्या 1987 माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री जनता विद्यालयातील १९८७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन तळवडे जनता विद्यालयात पार पडले .यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी जवळपास गेल्या 35 वर्षानंतर हे माजी विद्यार्थी या शाळेत एकत्र आले होते ..बाहेरगावी नोकरी निमित्त असणारे विद्यार्थी पण यावेळी या स्नेहसंमेलनाला चांगल्या प्रकारे उपस्थित होते. यावेळी अनेक वर्षानंतर या जुन्या विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी झाल्या. यावेळी जवळपास 30 पेक्षा अधिक माजी विद्यार्थी या जनता विद्यालयात एकत्र आले .
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी या प्रशालेतील मुख्याध्यापक ,माजी शिक्षक वर्ग यांचा यावेळी सत्कार केला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोमत व्यक्त केले जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. आपण आता त्या दहावीच्या वर्गात आहोत की काय ?असे त्यांना वाटू लागले.

यावेळी या कार्यक्रमा वेळी श्री जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई ,माजी मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर, शिक्षक प्रसाद आडेलकर , कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी बाळू कांडरकर, उदय परब, विलास परब ,विठ्ठल पावणोजी ,संतोष गावडे तसेच अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रम वेळी माजी मुख्याध्यापक शामसुंदर मालवणकर तसेच मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी यावेळी मार्गदर्शन केले .
यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय परब यांनी केले तर आभार प्रदर्शन अनधा पै यांनी केले.