सोनुर्ली गावाच्या हद्दीत अनधिकृत रित्या क्रशर सुरू असून ते तात्काळ बंद करा ?अन्यथा 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत ध्वजस्तंभा जवळ उपोषण करणार! सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक नाईक याच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावाच्या हद्दीत अनधिकृत रित्या क्रशर सुरू असून ते तात्काळ बंद करा अन्यथा 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत ध्वजस्तंभाजवळ उपोषण करण्याचा इशारा सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदाद्वारे दिला आहे.
श्री नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. की सोनुर्ली गावाच्या हद्दीमध्ये अनधिकृत क्रशर सुरू आहेत. संबंधित क्रशर चालकांकडून शासनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आले असून याला स्थानिक प्रशासनाकडून आशीर्वाद दिले जात आहेत .

याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी आवाज उठवूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. पावसाळ्यामध्ये या क्रशरच्या ठिकाणातून गौण खनिज युक्त प्रदूषित पाणी वाहून येऊन नजीकच्या शेतीमध्ये गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतीमध्ये डस्ट वाहून आल्याने शेतजमीन वाया जात आहे. तर या परिसरातून वाहणाऱ्या ओहळाच्या मुख्य प्रवाहावर दोन सार्वजनिक विहिरी असून त्यातील एकावर गावातील नळ योजना सुरू आहे. एकूणच त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य ही धोक्यात येऊ शकते.तसेच मोठ्या प्रमाणात क्रशिंग व ब्लास्टिंग केले जात, असल्याने गावातील घरांनाही तडे गेले आहे. या परिसरातील काजुबागायतींवर धुळीचे साम्राज्य पसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेत अशा प्रकारचे सर्व प्रदूषण विषयक नियम धाब्यावर बसून क्रशरचे कामकाज सुरू आहे.
श्री नाईक निवेदनात पुढे म्हटले आहे की, संबंधित क्रशरच्या परिसरात एक किलोमीटर अंतरावर रेल्वे ट्रॅक व ब्रिज आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होत असल्याने भविष्यात ब्रिज कोसळून मोठी हानी होऊ शकते या सर्वाला स्थानिक व जिल्हास्तरीय प्रशासन जबाबदार राहणार आहे.

यावर गावातील ग्रामस्थ नकुल गावकर, अनिल गावकर,तेजस गावकर,नरेश मोर्ये,संदिप गावकर,धोंडीराम गावकर यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन देऊन आक्षेप नोंदवलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाकडून घेतली गेली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत समोर ध्वजस्तंभाजवळ उपोषण करणार आहे. यावेळी न्याय न मिळाल्यास प्रसंगी आत्मदहन करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळें जिल्हाधिकारी यावर कोणती दाखल घेतात यावर याकडे सोनुर्ली ग्रामस्थ यांच लक्ष आहे.