सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी पाच पणत्या पेटवून आनंदोत्सव साजरा करावा!!राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर


सावंतवाडी

अयोध्या येथील श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील प्रत्येक घरात किमान पाच पणत्या पेटवून जिल्हावासियांनी आनंदोत्सव साजरा करावा ,असे आवाहन राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून शुक्रवारी केले आहे .
                २२जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सावंतवाडी शहरातील भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी मोती तलाव विद्युत रोषणाईने झगमगुन निघाला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा वाशिय यांना आवाहन केले की प्रत्येक घरात पाच तरी पणत्या पेटवून श्री राम मंदिरात मुर्तीप्राण प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्सव थाटात साजरा करूया असे आवाहन केले आहे.