मंत्री दीपक केसरकर १५ वर्षे मतदार संघाचा विकास करायला कमी पडल्यामुळे त्यांना आता मंत्री नारायण राणेंची पाय धरणी करण्याची वेळ आली! माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची टिका


लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचार महाविकास आघाडीचा मार्फत सावंतवाडी तालुक्यात जोरदार सुरु
सावंतवाडी
मंत्री दीपक केसरकर पंधरा वर्षे मतदारसंघाचा विकास करायला कमी पडल्यामुळे त्यांना आता मंत्री नारायण राणेंची पाय धरणी करण्याची वेळ आली आहे. अशी टिका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केली.
लोकसभेचे उमेदार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी तालुक्यात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा पंचायत समितीत जोरदार बैठका सुरु आहेत.यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी यावेळी या प्रचारमध्ये सहभागी आहेत. यावेळी विकास सावंत, जिल्हा प्रमुख संजय पडते, उपनेते जानवी सावंत, विधानसभा संपर्क शैलेश परब, दिलीप नार्वेकर साक्षी वंजारी चंद्रकांत गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, मायकल डिसूजा, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, रवींद्र म्हापसेकर, समीर वंजारी सहभागी झाले होते.सदर बैठका कलंबिस्त, कारीवडे ,आरोंदा ,साटेली माडखोल ,आदी ठिकाणी पार पडल्या.यावेळी प्रविण भोसले यांनी भाजप सरकार हे खोटी आश्वासने व फसव्या योजना राबवून जनतेची दिशाभूल करत असल्याचं निवडणुकीत त्यांना जनतेने योग्य दाखला दाखवावी असा आवाहन केलं.
संजय पडते यांनी खासदार विनायक राऊत हे सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत. त्यांना कोणती व्यक्ती जाऊन भेटू शकते. मात्र नारायण राणेच तसं नाही त्यांना भेटण्यासाठी आधी मधी माणसा लागतात. त्यामुळे खासदार हा सर्वसामान्यांचा असला पाहिजे, ज्याला जनता कधीही भेटू शकते अशा टीका केली.विकास सावंत यांनी कोरोनाच्या काळात दीपक केसरकर सर्वसामान्यांमध्ये होते का? तसेच आजपर्यंत दीपक केसरकारांनी वेळोवेळी आपल्या सोयीच राजकारण केला आहे अशी टीका केली.जानवी सावंत यांनी या देशात लोकशाही, सविधान न्यायव्यवस्था वाचली पाहिजे त्यामुळे अशा तऱ्हेची देशातली हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी विनायक राऊत आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिला पाहिजे अस आवाहन केलं.
तर दिलीप नार्वेकर यांनी गद्दारांना धडा शिकवला पाहिजे आज महाराष्ट्राची लोकशाही ला काळीमा फासण्याचा काम या गद्दाऱ्यांनी केलं आहे.