स्व. प्रकाश परब यांचा समाजकार्याचा वसा विलास नाईक यांनी पुढे चालू ठेवावा !डॉ प्रसाद देवधर

सहकार व सामाजिक कार्यात भाग घेऊन गावच्या विकासाला चालना द्यावी

सिंधुदुर्ग बँकेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल खास आयोजित केला होता सत्कार सोहळा

सावंतवाडी

स्वर्गीय प्रकाश परब यांचा गावच्या विकासाचां वसा पुढे चालू ठेवण्यासाठी विलास परब यांनी सहकार, सामाजिक, विकासात्मक कार्यात भाग घेणे गरजेचे आहे. सामाजिक सेवेची मोठी आवड असल्याने आता शासकीय सेवेतील निवृत्त झाल्यावर गावच्या विकासासाठी सहकार व सामाजिक क्षेत्रात पदार्पण करून गावाला विकासाच्या दिशेने न्यावे व युवा पिढीला सोबत घेऊन मार्गदर्शन करावे अशा स्वरूपाचे मार्गदर्शन डॉ. प्रसाद देवधर यांनी केले. सिंधुदुर्ग बँकेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल खास सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी ते बोलत होते.


गावच्या सहकार,सामाजिक व विकासात्मक कार्यात विलास नाईक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत इन्स्पेक्टर या पदावर काम करत असताना त्यांनी चांगल्या प्रकारे आपली सेवा बजावली . गेली 34 वर्ष त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत मनोभावे नोकरी केली आहे.त्यांच्या प्रामाणिक पणामुळे त्यांना जिल्हा बँकेमार्फत त्यांना अनेक वेळा गौरविण्यात आले .मोठ्या हालकीच्या जीवनात शिक्षण घेऊन त्यांनी यशस्वी भरारी घेतली व चांगल्या प्रकारे यश संपादन केले .जिद्द व चिकाटीने हे यश संपादन केले आहे.अशा प्रकारचे मनोगत प्रकाश परब मित्रमंडळाच्या व सेवाभावी संस्था ,अनेक मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले ,त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तळवडे गावातील अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने त्यांचा खास सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास जिल्हा बँकेतून निवृत्ती झाल्याबद्दल तळवडे येतील प्रकाश परब मित्र मंडळ,अर्बन बँक तळवडे, व विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने खास सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, लीलाधर घाडी, तळवडे अर्बन बँक चेअरमन विलास परब ,तळवडे सोसायटी चेअरमन आप्पा परब, यशवंत गोडकर, विलास नाईक यांच्या पत्नी मिरा नाईक, कन्या कु.नाईक,संजू पई, अनिल जाधव, सिमा मठकर,श्यामसुंदर मालवणकर ,दिलीप मालवणकर, सीमा मठकर , विकास नाईक,रवींद्र काजरेकर, महेश परब,सुधीर सावंत ,नमिता सावंत, संतोष राऊळ, योगेश सावंत ,रवींद्र सावंत, दिनेश सावंत विलास नाईक . व मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक नारायण परब व संजु पई यांनी केले.