5 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक अधिकारी परिवहन विभाग यांच्या कार्यालयावर माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तीव्र आंदोलन छेडणार!


सावंतवाडी
5 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक अधिकारी परिवहन विभाग यांच्या कार्यालयावर माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तीव्र आंदोलन छेडणार आहेत.
परिवहन विभागाचा चाललेला बेभरोशी कारभार तसेच प्रवासी वाहतूक परवाना घेऊन वाहतूक बस चालवणारे गोवा मुंबई तसेच मुंबई गोवा या बस मालकांकडून बसच्या असलेल्या सामान ठेवणाऱ्या डिकीतून व टपावरून वाहतूक करत मालवाहतुकीमध्ये विना बिल जीएसटी चुकवून माल वाहतूक केली जाते. त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही किंवा जीएसटी विभागाला कळवलेले नाही .त्याचप्रमाणे सदर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस मधून अमली पदार्थ गोवा बनावटीची दारू तसेच सोन्याचे मौल्यवान वस्तूंची तस्करी केली जाते. याची पोलीस यंत्रणेने माहिती देऊन कोणती तपासणी केली जात नाही व मुंबईहून येणाऱ्या बसमधून गोमासांची वाहतूक केली जाते याची देखील पाहणी केली नाही. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून दिवाळी गणपती या सणांच्या काळात महाराष्ट्र शासनाने परिवहन कायदे अंतर्गत प्रवासी वाहतूक एसटी भाड्याच्या दीडपट आकारणी करावी असा निर्णय झालेला असताना प्रवासी वाहतूक करणारी कंपनी किंवा बस मालक ॲपवरून दीडपट पेक्षा जास्त 1500 ते 3500 इतके भाडे आकारणी करतात हा ॲप आपल्या कार्यालयाने दाखवलेला आहे. तरीही त्याबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही .कोकणातील प्रवाशांना यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड पडतो यावर सूचना करूनही कोणतीही कारवाई केली नाही .त्याचप्रमाणे काही वाहतूक बसेसचे पासिंग झालेले नाही किंवा इन्शुरन्स काढलेले नाही प्रवासी वाहतूक परवाना काढून परमिट टॅक्स शासनाच्या तिजोरीत जमा होत नाही. एक परमिट आठ दिवस पंधरा दिवस किंवा महिना वापरले जाते, त्यामुळे वाहतूक करणारे प्रवासी किंवा परमिट लिस्ट वर असणारे प्रवासी भिन्न असतात त्यामुळे बसचा अपघात झाल्यास त्या प्रवाशांना कोणत्याही इन्शुरन्सचा फायदा मिळत नाही ,तसेच गोवा कर्नाटक राज्याच्या सीमेवरती सीसीटीव्ही लावण्याची व आर्थिक मदत करण्याची मा आयुक्त परिवहन यांच्याकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याकरिता मागणी केलेली आहे. दोन राज्यांच्या सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली ,असून त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने माजी आमदार उपरकर समर्थक व ड्रायव्हर असोसिएशन सिंधुदुर्ग हे 5 ऑगस्ट रोजी आरटीओ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे माजी आमदार जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार विजय जांभळे यांनी दिला आहे तसेच गोवा राज्यामध्ये ओव्हरलोड वाळू त्याचप्रमाणे आंबोली घाट ,फोंडा घाट बावडा घाट या घाटातून ओव्हरलोड वाहतूक दहा टायर गाड्या वाहतूक करतात त्यावर परिवहन विभागाकडून ओव्हरलोड वाहतुकीबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही ,आंबोली घाटात मल्टी एक्सेल गाड्यांना वाहतूक करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी बंदी घातलेली असतानाही वाहतूक केली जाते .
त्याचप्रमाणे कोल्हापूरला जोडणारा फोंडा घाट व वैभववाडीतून जाणारा बावडा घाट या घाटातून मल्टी एक्सेल गाड्या वाहतूक करत असतात त्या ओव्हरलोड गाड्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही अनेक बस चालक विन वॉच किंवा कमी वयाचे असलेले व लायसन्स नसलेल्या परप्रांतीय ड्रायव्हर प्रवासी बस चालवत असतात त्याचबरोबर अनेक ड्रायव्हर अमली पदार्थ किंवा दारूच्या नशेत असतात त्याचप्रमाणे मुंबई गोवा जाताना बस वर एकच ड्रायव्हर नेमलेला असतो त्या बस वर दुसरा ड्रायव्हर आहे किंवा नाही याची चौकशी करावी यामुळे अपघात टळू शकतात तसेच बऱ्याच कर्नाटक पासिंग च्या गाड्या सिंधुदुर्गातून गोवा राज्यात विना विमा टीपी न घेता किंवा त्या राज्यात सस्पेंड केलेल्या गाड्या वाहतूक करण्यात येत आहेत हे आरटीओच्या निदर्शनास आणून देखील कारवाई होत नाही नेमका वर्ग असतो कोणाचा? असा प्रश्न उपस्थित होतो त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 हायवे रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी पाणी साचून पाण्याचा निचरा होत आहे व व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 हा 60×40 मध्ये असल्याने ठेकेदारांना 60 टक्के बिल पंधरा वर्षात देण्याची अट शासनाने टेंडरमध्ये शेड्युल ए व बी मध्ये म्हटलेले असल्यामुळे या ठेकेदारांनी या रस्त्याची देखभाल पंधरा वर्षे करून अपघात होणार नाही याची काळजी घेणे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अपघात होतील त्या ठिकाणी ॲम्बुलन्स किंवा क्रेन तातडीने पाठवायची आहे व राष्ट्रीय महामार्गावरील आरटीओच्या नियमाप्रमाणे असलेल्या साईन बोर्ड स्पष्ट दिसतील असे फलक लावायचे आहेत .स्पीड लिमिट चे बोर्ड ठीक ठिकाणी लावायची गरज आहे तेही अद्याप केलेले नाही .त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 ला येताना परप्रांतीय ड्रायव्हर व रस्त्याची माहिती नसलेले ड्राइवर गाडी स्पीड मध्ये चालवतात किंवा कोणत्याही नियंत्रण जाऊन जखमी झाल्यास मदत कुठे मागायची हे कळत नसल्याने किमान ते 5 किलोमीटरवर हेल्पलाइन बोर्ड लावून त्या बोर्डवर ॲम्बुलन्स व क्रेन पुरवण्याकरिता 24 तास उपलब्ध असलेले मोबाईल नंबर लिहिणे व जवळच्या हॉस्पिटल चा मोबाईल नंबर तसेच जवळच्या पोलीस स्टेशनच्या मोबाईल नंबर तसेच आपातकालीन विभागाच्या दूरध्वनी क्रमांक लिहिणे असे सर्व शासकीय विभागांचे नंबर लावून राष्ट्रीय महामार्गाच्या हेल्पलाइन नंबर लावणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे एजंट मुक्त परिवहन कार्यालय असल्याची घोषणा केली आहे बऱ्याच परिवहन विभागाच्या सुविधा ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक व सोईस्कर केल्या असताना बहुतांशी वेळी सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयाचा सर्वर बंद असतो किंवा अर्ज केलेला जात नाही त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने काम करावे लागते हे ऑफलाइन पद्धतीचे काम अनधिकृत असलेला एजंटांकडून केले जाते त्या एजंटांच्या फॉर्म वरती विशिष्ट पद्धतीचा कोड लावून जेवढी झालेली कामे त्यांचा कामे एजंट परिवहन विभागाचा हिस्सा व पैसे गोळा करण्याचे काम करतात असे बऱ्याचदा आपल्या कार्यालयाकडून दिसून आल्याची माहिती आढळत आहे वारंवार आपल्याला सूचना देऊन देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने 5 ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असे श्री सुभेदार व जांभळे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
यावेळी माजी आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार ,विजय जांभळे ,मंदार नाईक ,नंदू परब ,मनोज कांबळी, अभी पेडणेकर ,ओमकार गावडे ,विजय गावडे, रमेश शेळके ,पप्पू आरोलकर ,मनोहर कोल्हे, भाऊ केरकर, वेंकु परब आदि उपस्थित होते.