माजी आमदार राजन तेली यांची पराभवाची हॅट्रिक होणारं! शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर स्पष्टच बोलले

कोकणच्या विकासासाठी आता काम करणार

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संघात अनिष्ट प्रवृत्तींना थारा नाही

सावंतवाडी :

सावंतवाडी मतदारसंघाला एक आगळी वेगळी परंपरा आहेआणि ती परंपरा व पावित्र्य जपण्याचे काम मी करीत आलो आहे. ही पाटेकरांची भूमी असून इथे अनिष्ट प्रवृत्तींना थारा नाही तसेच इथे वाईट विचारही रुजत नाहीत. त्यामुळे राजन तेली यांचं ज्या पद्धतीचा राजकारण सुरू आहे ते चुकीचं असून येथील जनता त्यांना थारा देणार नाही. यावेळी त्यांची पराभवाची हॅट्रिक होणारं आहे, अशी टिका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.


गेली काही वर्षे माझ्यावर राज्याची जबाबदारी असल्याने मी येथील जनतेला वेळ देऊ शकलो नाही यापुढील जास्तीत जास्त वेळ मी मतदार संघातील जनतेसाठी देणार असून पुढील काळात वरिष्ठांकडून कोकणची जबाबदारी मागून घेणार आहे, . असे ते सावंतवाडी ठिकाणी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. सावंतवाडी मतदारसंघात मागील काही वर्षात हजारो कोटींचा निधी आणला आहे. अनेक प्रकल्प मंजूर केले आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच मला पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहावे लागणार आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास मी नक्कीच निवडणूक लढवेन, असेही त्यांनी सांगितले.


कोकण हा सर्वात संपन्न प्रदेश आहे. मुंबई हा देखील कोकणचाच एक भाग आहे. त्यामुळे कोकण ही एक समृद्ध भूमी बनवणं हे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता मला केवळ कोकणासाठी काम करायचं आहे. रत्नसिंधु योजनेच्या माध्यमातून मी कोकणच्या विकासासाठी येथील पर्यटन वाढीसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले आहेत.
राजन तेली यांना यापूर्वी नारायण राणे यांनी त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद देण्यात आलं त्यानंतरच्या निवडणुकीत तेथेही त्यांचा पराभव झाला. आता वारंवार त्यांचा पराभव होतो यात आमचा दोष नसून त्याचं कारण त्यांनी शोधावं उगाच आमच्यावर टीका करू नये. आता ज्या घरात ते गेले आहेत तेथे त्यांनी खुश राहावं असे सांगत असे ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून मी निवडणूक लढवत असताना सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मला नक्कीच साथ देतील. भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना भेटून निवडणुकीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची भेट झाल्यावर सर्वच कामाला लागतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.