पराभव दिसू लागल्याने राजन तेलींकडून अशा प्रकारची टीका !मंत्री दिपक केसरकर; मळगाव येथील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश


सावंतवाडी:
राजन तेली हेच खरे दहशतवादी प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. त्यांना पराभव समोर दिसू लागला असून येथील जनता त्यांना माफ करणार नाही. प्रवीण भोसले यांनी आपल्याला धमकी दिली, असा पंधरा वर्षांनी केलेला आरोप हा मोठा विनोद आहे. मुख्यमंत्री सावंतवाडीत आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल असे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी सांगितले.
दरम्यान, काही झाले तरीही निवडणूक प्रक्रिया शांततेत होणार आहे. विरोधकांना कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते टीका करतात. आजपर्यंत त्यांना टीका करण्यापलीकडे काही जमले नाही. धमक्या दिल्या असे जे आरोप करत आहेत. त्यांच्यावर किती केसेस आहेत? हे त्यांनी उत्तर द्यावे, असा टोला श्री. केसरकर यांनी लगावला.

मळगाव येथील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महेश शिरोडकर, सचिन हरमलकर, संतोष कुंभार, श्रीकांत नाईक, शंकर कुंभार आदी युवकांचा समावेश होता. दरम्यान या प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर केसरकर पत्रकार परिषदेत बोलत होते.
तेलींना पराभव समोर दिसू लागल्यामुळे आपल्याला धमक्या दिल्या असे सांगून स्टंटबाजी करत आहेत. मात्र काही झाले तरी त्यांच्या या टीकेला जनता बळी पडणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मी बोलणार नाही. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. अदानींना मी जागा देण्यासाठी आंबोली फिरलो असे सांगणारे ठाकरे हे स्वतः त्यांच्या विमानातून प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात मी काय बोलणार? असा टोला त्यांनी लगावला.
श्री . केसरकर म्हणाले, तेलींना येथील जनता माफ करणार नाही. मोठ्या लोकांची नावे घेतली की प्रसिद्धी मिळते, असे त्यांना वाटत असल्यामुळे ते राणेंचे नाव बदनाम करत आहेत. परंतु काही झाले तरीही निवडणूक प्रक्रिया शांततेत होणार आहे. त्यांना कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते टीका करतात. आजपर्यंत त्यांना टीका करण्यापलीकडे काही जमले नाही, धमक्या दिल्या, असे जे आरोप करत आहेत. त्यांच्यावर किती केसेस आहेत? हे त्यांनी उत्तर द्यावे, असाही टोला त्यांनी लगावला.

