मंत्री दिपक केसरकर २३ तारीखला विजयाचा चौकार मारणारच!मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास! मला हलक्यात घेतल्याने सरकार पलटून टाकले



हे सरकार घेणारं नाही तर देणारं आहे
सावंतवाडी:
दिपक केसरकर हे सुसंस्कृत, शांत, संयमी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून ते आमचे सचिन तेंडुलकर आहेत. त्यामुळे ते विजयाचा चौकार मारून कप जिंकतील असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, लाडक्या बहिणी योजनेचे पाच हप्ते तुमच्या खात्यात जमा झाले आहेत. या आमचे सरकार आले तर २० तारखेनंतर डिसेंबरचे पैसेही जमा होतील. हे सरकार घेणारं नाही तर देणारं आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
महायुतीचे उमेदवार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ आज सावंतवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस मोठ्या संख्येने महिला, पुरुष उपस्थित होते. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवराज लखमराजे भोसले, शिवसेनेचे केरळ प्रमुख हरिकुमार, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख निता कविटकर, आरपीआय जिल्हाध्यक्ष रमाकांत जाधव, माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, काका कुडाळकर, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, महेश सारंग, सुरेश गवस, प्रेमानंद देसाई, बबन राणे, रवी मडगावकर, नितीन मांजरेकर, अजय गोंदावळे, अन्नपूर्णा कोरगावकर, विद्या परब, संदीप कुडतरकर, भारती मोरे, मोहिनी मडगावकर, बाबू कुडतरकर, सुरेश गवस, सुरज परब, आदी उपस्थित होते.


. केसरकर हे आमचे ऑलराऊंडर सचिन तेंडुलकर आहे
यावेळी बोलताना श्री शिंदे म्हणाले, दीपक केसरकर हे एक चांगले लोकप्रतिनिधी असून अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना निवडून दिल्यास ते या भागात अजून चांगल्या योजना राबवू शकतात. केसरकर हे आमचे ऑलराऊंडर सचिन तेंडुलकर आहेत. त्यांना चक्रव्यूह कसा भेदायचा हे माहिती आहे. बाळासाहेबांनी कोकणी माणसावर प्रेम केलं. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केले. यादरम्यान आमदारांचे होत असलेले खच्चीकरण मी पाहू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही पक्षातून बाहेर पडलो असे त्यांनी सांगितले.
सीएम म्हणजे कॉमन मॅन. एकनाथ शिंदे संघर्षातून निर्माण झाला आहे. मला जेलमध्ये टाकण्याच्या पोकळ धमक्या कोणी देऊ नये, अशा धक्यांना मी घाबरत नाही. मला हलक्यामध्ये घेतलं म्हणून टांगा पलटी केला. आता निवडणुका झाल्यानंतर गळ्यात कॅमेरा लटकवून जंगलात फिरण्याची वेळ येणार असल्याचा टोला श्री. केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.


आम्ही जाहीर केलेल्या वचननाम्यामध्ये लाडक्या बहिणींच्या हफ्त्या वाढवून 2100 रुपये, तर शेतकरी सन्मान योजना पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे. तसेच 25 हजार महिला पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. वृद्धांची पेन्शन योजना वाढवून 2100 रुपये करण्यात येणार असल्याचे दिले आहे. विरोधकांनी सगळ्या योजना बंद करणार असे सांगितलं होतं. मग तुम्ही चालू तरी काय करणार असा सवाल त्यांनी यावेळी केला.

