कोकणानं महाराष्ट्राला, मराठी भाषेला फार मोठं योगदान दिलं विश्व साहित्य संमेलनाचा पुरस्कार’ हा मराठी भाषेचा, कोमसापचा सन्मान !पद्मश्री मधु मंगेश कर्णिक.


सावंतवाडी
कोकणानं महाराष्ट्राला, मराठी भाषेला फार मोठं योगदान दिलं . वाड़्मयीन प्रकारात महाराष्ट्राला सर्वाधिक साहित्यिक या कोकणानं दिलेत. सावंतवाडीपासून डहाणूपर्यंत नवा लेखक वर्गही तयार होत आहे असं मत कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले. तसेच भाषेचा अभिमान असणे गैर नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वांनी प्रयत्न केले होते. त्याला यश प्राप्त झालं आहेकोकणानं महाराष्ट्राला, मराठी भाषेला फार मोठं योगदान दिलं आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक साहित्यिक कोकणानं दिले आहेत. कथा, कविता, कादंबरी, नाटक या कोणत्याही वाड़्मयीन क्षेत्रात कोकणच नाव आहे. कोकणात साहित्यिकांना एकत्र आणत व्यासपीठ देण्याचं काम कोकण मराठी साहित्य परिषदेनं केलं. त्यामुळे नवे हात लिहू लागलेत. पुस्तक प्रकाशित व्हायला लागली. सावंतवाडी पासून डहाणूपर्यंत नवा लेखक वर्ग तयार होऊन चैतन्याच वातावरण निर्माण झालं आहे. सगळ्या विचारांचे लोक या परिषदेत आहेत. मराठी भाषा, मराठी संस्कृती, महाराष्ट्राचा अभिमान साहित्यातून आम्ही व्यक्त करतो असे उद्गार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी काढले..
‘विश्व साहित्य संमेलनाचा पुरस्कार’ हा सन्मान हा मराठी भाषेचा, कोमसापचा आहे. याच भावनेनं तो सन्मान मस्तकी लावत आहे अशा भावना पद्मश्री श्री. कर्णिक यांनी व्यक्त केल्या. सिंधुदुर्गात आले असता पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी भावना व्यक्त केल्या.

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक महणाले, आपल्या भाषेचा, प्रांताचा, मातीचा अभिमान असणे ही चांगली गोष्ट आहे. तो अभिमान असण्यात गैर नाही. मी मराठी भाषेचा लेखक, मराठी साहित्यिक आहे याचा अधिक आनंद आहे. या वयात सन्मानाच अप्रूप राहिलेलं नाही. मात्र, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना कोमसापनं २४ साहित्य संस्थांना एकत्र घेऊन आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलन केल होत. मराठी भाषा भवन व्हावं, १२ वी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य करावी, भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या प्रमुख मागण्या आम्ही केल्या होत्या. मराठी भाषेला हा दर्जा देण्याच महाराष्ट्र शासनाच्या हाती नव्हतं. ते केंद्र शासनाच्या हाती होत. त्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज होती. महाराष्ट्र शासनाकडुन त्यासाठी पुढाकार घेण गरजेचं होत. कोमसापच्या माध्यमातून भालचंद्र मुणगेकरांसह सर्व स्तरातून एक हजार मराठी भाषिक एकत्र आलो. राज्यात अधिवेशन सुरू होत. यावेळी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत सरकारनं अभिवचन दिले. मराठी भाषा भवन व भाषा अनिवार्य करण्यासाठी जीआरही काढले. या सगळ्या कार्यात मधू मंगेश कर्णिक होते. त्यामुळे विश्व साहित्य संमेलनाचा हा सन्मान मराठी भाषेचा, कोमसापचा आहे. याच भावनेनं तो मी मस्तकी लावत आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.