आर्थिक विषमता देशाच्या विकासात अडसर ठरते “प्रा. डॉ. रमाकांत गावडे! राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती करण्यात आली साजरी


सावंतवाडी
राजे प्रतिष्ठान सिंधुदूर्ग शाखे मार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली .यावेळी व्यसपीठावर अध्यक्ष संतोष तळवणेकर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. रमाकांत गावडे तसेच अनमान्यवर उपस्थित होते.सर्व प्रथम बाबासाहेब यांच्या फोटोला अध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या हस्ते हार घातल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रजोलन करण्यात आले. यानंतर प्रमुख वक्ते प्रा.डॉ. रमाकांत गावडे गोगटे वाळके कॉलेज बांदा यांनी विचार व्यक्त केले. आर्थिक विषमता चिंताजंक असून आर्थिक विषमता देशाच्या विकासाला अडसर ठरते असे मत त्यांनी व्यक्त केले. पुढे त्यांनी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच जीवनावर प्रकाश टाकला डॉ. भीमराव रामजी आंबेडकरयांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू (मध्यप्रदेश) येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सातारा (महाराष्ट्र) येथे पूर्ण केले आणि माध्यमिक शिक्षण बॉम्बेच्या एल्फिन्स्टन हायस्कूल मधून पूर्ण केले. शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना अत्यंत भेदभावाचा सामना करावा लागला. त्यांच्या ‘Waiting for a Visa’ या आत्मकथनपर टिपणीत त्यांनी लिहिले की, शाळेतील सर्वसामान्य नळावरून पाणी पिण्याची त्यांना परवानगी नव्हती.डॉ. आंबेडकर यांनी १९१२ मध्ये बॉम्बे विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांमध्ये B.A. पदवी प्राप्त केली. त्यांच्या उत्तम शैक्षणिक कामगिरीसाठी १९१३ मध्ये सयाजीराव गायकवाड (बडोद्याचे महाराज) यांनी शिष्यवृत्ती दिली, ज्यामुळे त्यांना न्यू यॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात M.A. आणि Ph.D. करण्याची संधी मिळाली. त्यांनी १९१६ The Evolution of Provincial Finance in India: A Study in the Provincial Decentralization of Imperial Finance” या विषयावर Ph.D. साठी प्रबंध सादर केला कोलंबियानंतर, त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण सुरू केले आणि ग्रेस इन मध्ये कायद्याचे शिक्षण सुरू केले. मात्र आर्थिक अडचणीमुळे १९१७ मध्ये भारतात परतावे लागले. १९१८ मध्ये त्यांनी सायडेनहॅम कॉलेज, मुंबई येथे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य सुरू केले.
भारतात परतल्यानंतर, डॉ. आंबेडकर यांनी १९२७ मध्ये महाड सत्याग्रहाचे नेतृत्व केले, जे अस्पृश्य जातींसाठी सार्वजनिक संसाधनांवर समान हक्क मिळवण्यासाठी लढा होता. त्याच वर्षी त्यांची बॉम्बे विधानपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली.
१९३५ मध्ये त्यांची मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्राचार्य म्हणून नेमणूक झाली, जिथे ते १९२८पासून अध्यापन करत होते. नंतर, १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेवर ते ‘लेबर मेंबर’ म्हणून कार्यरत राहिले.
१९४६ मध्ये त्यांची संविधान सभेवर निवड झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर, ते घटनासंहितेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. १९५५ मध्ये त्यांची तब्येत खालावली. अखेर त्यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीत निधन झाले.
या कार्यक्रमाचे आभार संचिता गावडे यांनी मानले.जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर, जिल्हा सदस्य प्रा. डॉ रमाकांत गावडे, तालुका अध्यक्ष संचिता गावडे, तालुका खजिनदार दर्शना राणे, तालुका सदस्य प्रणिता. शोभा सावंत सावंत, संगीता रेडकर. सर्व पदाधिकारी कार्यक्रम उपस्थित होते