प्रशासन व ठेकेदार यांचे योग्य नियोजन नसल्यामुळे न्हावेली – मातोंड रस्ता बनला चिखलमय /न्हावेली धाऊसकरवाडी पेंडूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरचे पुलही बनले धोकादायक


प्रशासनाला जाग कधी येणारं ग्रामस्थांचे झाले हाल

धाऊसकरवाडीकडे जाणारे पुल बनले धोकादायक
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे न्हावेली – मातोंड रस्ता बनला चिखलमय
न्हावेली प्रतिनिधि
माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला न्हावेली – मातोंड हा अंदाजे अडीज किलोमीटरचा रस्ता ठेकेदारांने अपुर्ण अवस्थेत ठेवल्यामुळे मान्सूनपूर्व कोसळलेल्या पावसामुळे चिखलमय बनला आहे.सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर प्रवास करणे नागरीकांना जोखीमेचे बनले आहे.
संबंधित ठेकेदारांकडून नवीन रस्ता बनवण्यासाठी जुन्या रस्त्याची जेसीबी आणून खोदाई करुन घेतली आणि सदरील रस्ता अर्धवट स्थितीत सोडून दुसऱ्या कामासाठी यंञसामग्री घेऊन गेल्याने रस्ता पुर्णपणे उखडलेल्या स्थितीत राहीला, त्यानंतर अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता अक्षरक्षः चिखलमय बनला त्यामुळे वाहनधारक, नागरीकांना प्रवास करणे धोकादायक बनले असून याबाबत नागरीकांनी ठेकेदारांवर संताप व्यक्त केला.
या प्रकारामुळे दोन गावातील संपर्क तुटला आहे. या प्रकाराची बांधकाम विभागाने दखल घेण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.यावेळी दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

