संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील विद्यार्थ्यांची रंगोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पातळीवर घे भरारी

कु. सार्थक शिवप्रसाद परब याविद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत प्रशालेच्या नावात रोवला मानाचा तुरा

सावंतवाडी प्रतिनिधि


राष्ट्रस्तरीय चित्रकला स्पर्धा मुंबई, महाराष्ट्र संचालित रंगोत्सव महोत्सवाअंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.या विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, टॅटू बनवणे, कार्टून बनविणे,चित्र रेखाटणे,फिंगर अँड थम पेंटिग,कोलाज व भेटकार्ड बनविणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करत प्रशालेचे नाव यशाच्या उंच शिखरावर पोहचवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांपैकी 24 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र ,18 विद्यार्थ्यांनी रजत पदक व प्रशस्तीपत्र , 8 विद्यार्थ्यांनी कांस्य पदक व प्रशस्तीपत्र व 5 विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ बक्षिस मिळवून प्रशालेचे नाव यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचवले.इयत्ता चौथीत शिकणाऱ्या कु. सार्थक शिवप्रसाद परब या विद्यार्थ्याने कार्टून बनविणे या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत प्रशालेच्या नावात मानाचा तुरा रोवला आहे.तसेच इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनी कु.मोरिश्का मानवेल डायस हिने हस्ताक्षर स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक पटकावत नेत्रदीपक कामगिरी केली.
विद्यार्थ्यांना या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन करण्याचे कार्य प्रशालेतील सहायक शिक्षिका श्रीमती.संध्या पवार मॅडम व श्रीमती. तेजा मेस्त्री मॅडम यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल रंगोत्सव महोत्सव संस्थेमार्फत प्रशालेला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रशालेचे चेअरमन डॉ.शेखर जैन सर , मुख्याध्यापक श्री. हेमंत तानावडे सर,सर्व शिक्षक वृंद या सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत तानावडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थांचे कौतुक केले.
संस्थेचे चेअरमन डॉ. शेखर जैन सर यांनी विद्यार्थांच्या सर्वांगिण विकासात त्यांच्या अंगी असणारे सुप्त गुण ओळखणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून सर्व यशस्वी विद्यार्थांचे कौतुक केले.