जनसेवा व लोक कल्याणासाठी सदैव कार्य तत्पर राहणार ! सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब

आरोग्य, रोजगार, कृषी, मच्छीमार, महाराष्ट्र विविध योजना व उपक्रम राबविताना सरकारने दिरंगाई करण्याचें काम केले आहे त्याकडे लक्ष मी लक्ष देणार आहे.जनसेवा व लोक कल्याणासाठी सदैव कार्य तत्पर राहणार असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी वेंगुले येथील कार्यक्रम प्रसंगी मत व्यक्त केले.

वेंगुर्ला आयोजित दिवाळी फराळाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहून सर्व उपस्थितांना दिवाळीच्या निमित्त , तसेच आज होत असलेल्या भावा बहिणीच नात वृध्दिंगत करणाऱ्या भाऊबीज च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित महिला वर्गातून आजच्या या सत्ते मध्ये असलेल्या नेत्यांनी कोणतीही विकासात्मक किंवा धोरणात्मक अशी काम केली नाही याची खंत व्यक्त केली. तसेच आता ताई तुम्ही निवडणुकी साठी अर्ज दाखल केलात तर तुम्ही विजयी होऊन आमचा महिलांचा आवाज बनून आमच्यासाठी कार्य करा अशा अपेक्षा देखील महिला वर्गाने यावेळी बोलून दाखवल्या.
यावेळी उपस्थिताना संबोधित करताना मी आता यावेळी लढणार आणि जिंकणारच आणि जिंकून आल्यावर सर्व प्रथम ज्या पद्धतीने वेंगुर्ला , सावंतवाडी , दोडामार्ग शहराला जशी चांगल्या दर्जाची ओळख होती ती आज कुठे तरी कमी होत चालली आहे तर ते गतवैभव पुन्हा मी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहिन व इथल्या आरोग्य विषयक , रोजगार विषयक उणीवा आहेत त्या देखील पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने मी कटिबद्ध राहिन असा शब्द दिला.

त्याच बरोबर आजच्या या दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन वेंगुर्ला येथील मांजरेकर परिवाराच्या वतीने केल्या बद्दल त्यांचे आभार देखील मानले. यावेळी माझ् या समवेत श्री.योगेश कुबल , विनायक परब ,विक्रांत कांबळी , सौ.दीपिका राणे , सौ. अदिती चुडजी , सायली पांगम , ऋतिक परब , विवेक गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते.