कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्यानजीक १४ जुलै सायंकाळी मातीचा भराव रुळावर कोसळून ठप्प झालेली रेल्वे वाहतूक दुपार पर्यंत पूर्वपदावर आलेली नाही.


सावंतवाडी प्रतिनिधी:
कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्यानजीक दि. १४ जुलै सायंकाळी मातीचा भराव रुळावर कोसळून ठप्प झालेली रेल्वे वाहतूक दुपार पर्यंत पूर्वपदावर आलेली नाही.
मुसळधार पावसामुळे रात्रीच्या सुमारास दरडही कोसळली. पोकलेन, जेसीबी व अन्य साधन साधनसामुग्री तसेच १००हुन अधिक कामगार यांच्या सहाय्याने दरड व मातीचा भराव हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे यावेळी एकूण १५ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून यात वंदे भारत एक्सप्रेस समावेश आहे. २० रेल्वे गाड्या अन्य मार्गे वळवण्यात आल्या आहेत. चार ते पाच एक्सप्रेस गाड्या कणकवली रत्नागिरी, वैभववाडी त्या स्थानकात थांबवण्यात आल्या असून प्रवाशांचे हाल झाले आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कोणत्याहि प्रकारचे हाल होऊ नये. यासाठी जादा बसेस सोडून मुंबईकडे सोडण्याची व्यवस्था केली आहे. एमडी यांनी काही तासाचा रेल्वे सेवा सुरू होणार अशी माहिती दिली आहे.