

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवानग्या आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा
चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवानग्या आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा
– पालकमंत्री नितेश राणे
मुंबई, – मुंबई – चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि त्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी शासनाने उडान च्या धर्तीवर आरसीएस फंडिंग चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दिल्या.
मंत्रालयात आज चिपी – मुंबई विमानसेवा विषयी बैठक झाली त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस विमान वाहतुक सचिव संजय सेठी, विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चिपी - मुंबई विमानसेवा सुरू होणे ही सिंधुदुर्गसाठी भावनिक बाब असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, या विमानतळासाठीच्या पायाभूत सुविधाही लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने चिपी विमानतळास वेगळे महत्व आहे. चिपी - मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एक महिन्यात घेण्यात याव्यात. विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर यांनी समन्वयाने काम करावे. भविष्यात या विमानतळाला मोठे महत्त्व येणार असल्याने प्राधान्याने कामे करावीत. सुशोभी कारणाचे काम ताडीने हाती घ्यावे अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.





